मिट्टी को नमन वीरों का वंदन म्हणत विवेकानंद विद्यालय,चोपडा तर्फे क्रांति दिन साजरा
दि. ९ ऑगस्ट २०२३
प्रतिनिधी, चोपडा
स्वातंत्र्यासाठी बलिदान करणाऱ्या क्रांतिवीरांचं स्मरण करण्याचा दिवस व जागतिक आदिवासी दिन विवेकानंद विद्यालयात वक्तृत्व स्पर्धा, उत्स्फूर्त वक्तृत्व,भित्तिपत्रिका सादरीकरण,गीतगायन व क्रांतिकारकांची वेशभूषा साकारुन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतमाता,आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, स्वा.वीर सावरकर,चंद्रशेखर आझाद व भगतसिंग या क्रांतिकारकांच्या प्रतिमेचे पूजन व सर्व ज्ञात-अज्ञात क्रांतिकारकांचे स्मरण करण्यात आले. विद्यालयातील इयत्ता सहावीची विद्यार्थिनी कु.प्रियंका भोई हिने ऐ मेरे वतन के लोगों... हे गीत तर कु.कल्याणी पाटील व कु. गौरवी पाटील या दोघींनी हा देश माझा...हे गीतगायन सादर केले. पुढील विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात क्रांतिदिनावर आधारित अतिशय सुंदर वेशभूषा व संवाद सादर केले.
*वेशभूषा सादर करणारे इयत्ता सहावीचे विद्यार्थी व विद्यार्थिनी*
१)अथर्व बोरसे
२)गिरीराज पाटील
३)यश शिंपी
४)सिद्धांत चौधरी
५)रोहित पाटील
६)निपुण पाटील
७)मो.लबीब शेख इम्रान
८)वेदांत चौधरी
९)ईशान चौधरी
१०)सौम्या पाटील
*क्रांतिदिनाची माहितीपूर्ण भित्तिपत्रिका बनवणारे इयत्ता आठवी व नववीचे विद्यार्थी व विद्यार्थिनी*
१) आर्यन पाटील.
२) वेदांत चौधरी.
३) श्रीकांत चौधरी.
४) प्रथमेश परदेशी
५) स्वरा हरताळकर.
६) निशिता चौधरी.
७) पूजा पाटील.
८) ऋतुजा पाटील.
९) स्वरा शुक्ल,
१०) कोमल पाटील.
११) किमया बडगुजर,
१२) रजत पाटील
१३) लोकेंद्र येसे-
१४) यश पाटील.
१५) वैष्णवी येसे
१६) भूमिका पाटील.
कु. जैनब जावेद तडवी (इ.९वी) हिने आदिवासी स्वातंत्र्यसैनिक बिरसा मुंडा यांच्याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. उपशिक्षक जावेद तडवी यांनी मोजक्या शब्दात क्रांति दिन व जागतिक आदिवासी दिन याबद्दल विद्यार्थ्यांना महत्वपूर्ण माहिती सांगितली. त्यानंतर क्रांति दिनानिमित्त आयोजित वक्तृत्व व उत्स्फूर्त वक्तृत्व या स्पर्धांचा निकाल जाहीर करण्यात आला. उपशिक्षक प्रसाद वैद्य व सौ.स्मृति माळी यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले. स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे-
*प्रथम*-चि.सत्यम संजय सोनवणे (इ.१०वी)
*द्वितीय*-कु.आरुषी प्रदीप पाटील (इ.९वी)
*तृतीय*-चि. तनीष पवन लाठी (इ.१०वी)
उपशिक्षिका सौ. माधुरी हळपे, सौ.स्मृति माळी श्री.राधेश्याम पाटील व श्रीमती शितल पाटील यांनी या स्पर्धेचे नियोजन केले.
कार्यक्रमाच्या समारोपापूर्वी देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांना समर्पित *मेरी माटी मेरा देश- मिट्टी को नमन वीरों का वंदन* या अभियानाअंतर्गत पंचप्राण प्रतिज्ञा उपशिक्षक श्री. पवन लाठी यांनी सर्व विद्यार्थी व सर्व शिक्षकवृंद यांचेकडून म्हणवून घेतली.
कार्यक्रमाचे सुंदर नियोजन व सादरीकरण यामुळे विद्यार्थ्यांनी देशभक्तीचे वातावरण अनुभवले व त्याला दाद दिली.
कलाशिक्षक श्री. राकेश विसपुते यांनी सुंदर फलक लेखन व मेरी मिट्टी मेरा देश या आशयाची सुंदर रांगोळी काढून वातावरण निर्मिती केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती शितल पाटील यांनी केले.
श्री.पवन लाठी, सर्व शिक्षकवृंद व कर्मचारीवृंद याप्रसंगी उपस्थित होते.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.विकास हरताळकर,अध्यक्ष डॉ.विजय पोतदार,उपाध्यक्ष श्री. घनश्यामभाई अग्रवाल, सचिव ॲड.रवींद्र जैन, सहसचिव डॉ.विनीत हरताळकर, सर्व विश्वस्त, मुख्याध्यापक श्री.नरेंद्र भावे व पालकवृंद यांनी या वक्तृत्व स्पर्धेतील यशस्वी व सहभागी विद्यार्थी, वेशभूषा सादर करणारे तसेच माहितीपूर्ण भित्तिपत्रिका बनवणारे विद्यार्थी व सर्व मार्गदर्शक शिक्षकवृंद यांचे कौतुक व अभिनंदन केले.

0 टिप्पण्या