Type Here to Get Search Results !

डॉ सुरेश बोरोले यांच्या वाढदिवस निमित्त मातृ - पितृ पूजन कार्यक्रमाचे आयोजन...

मुख्य संपादक:- संदीप पाटील 0

 डॉ सुरेश बोरोले यांच्या वाढदिवस निमित्त मातृ - पितृ पूजन कार्यक्रमाचे आयोजन...


  चोपडा प्रतिनिधी :- संदिप पाटील



    पंकज समूहाचे अध्यक्ष डॉ सुरेश बोरोले यांच्या वाढदिवस निमित्त मातृ - पितृ पूजन कार्यक्रम मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.या प्रसंगी ३०० माता - पित्यांचे पूजन करण्यात आले. आपल्या माता - पितांच्या पायांना पाण्याने व पंचामृतने स्वच्छ धुवून पायांना फुले अर्पण करुन पूजन केले. त्यानंतर त्यांचे औक्षण करून आशीर्वाद घेतले. यावेळी पंकज बोरोले यांनी सपत्नीक आपले पिता डॉ सुरेश बोरोले व माता हेमलता बोरोले यांचे पूजन करून आशीर्वाद घेतले.
      मातृ - पितृ पूजन सर्व श्रेष्ठ आहे !! भगवान श्रीगणेशाचे आपल्या आईवडिलांना प्रदक्षिणा करणे आठवून आपण आपल्या आई - वडिलांचे कृतर्थाने पूजन करण्याचे हे व्रत अती उत्कृष्ठ आहे. सर्व देव प्रसन्न करण्यात हे व्रत हातभार लावते. सूर्य आणि चंद्र दोन्ही अनुकूल होऊन जातात.अशी आख्यायिका आहे.
     डॉ सुरेश बोरोले आपल्या मनोगतात म्हणाले की, पूर्वीच्या काळी मुले आई-वडिलांना काशी -  तीर्थयात्रेला घेऊन जायचे, अशी प्रथा होती; पण आज अनेक ठिकाणी असे दिसते की, मुले आई-वडिलांना दुःखी करत आहे. सध्याचे युग ‘गरज सरो आणि वैद्य मरो’, असे झाले आहे. ‘मुलांना पाळणाघरात आणि आई-वडिलांना वृद्धाश्रमात’ ठेवणारी पाश्‍चात्त्य संस्कृतीचा पगडा असलेली पिढी आता आईवडिलांकडे ‘उपयोगिते’च्या दृष्टीने पाहू लागली आहे. आईवडिलांचा अनादर करणार्‍यांवर तेच दुःख उलटते. मुलगा वडील होतो, तेव्हा त्याने आई-वडिलांना दिलेल्या दुःखाचा वाटा त्याच्या वाट्याला येतो.सध्या समाजात आई-वडील वृद्ध झाले की, मुलांना नकोसे होतात. काहीजण ‘त्यांची अडगळ नको’; म्हणून वेगळे घर घेऊन राहतात, तर काही जण त्यांना वृद्धाश्रमात सोडून देतात. नात्यांमध्ये व्यावहारिक दृष्टीकोन आणि पैशांचे प्रेम वाढल्याने आज वृद्धाश्रमांचे पीक येत आहे. वृद्धाश्रमातील वृद्धांच्या व्यथा कोणाही सह्यदय व्यक्तीचे मन हेलावून टाकतात. वृद्धाश्रमात रहाणार्‍या वृद्धांचे कौटुंबिक अवहेलना हे तेथे रहावे लागण्यामागचे मुख्य कारण असते. ज्या आई-वडिलांनी आपल्यावर चांगले संस्कार करून समाजात नावलौकिक मिळवून दिला, त्यांच्याप्रतीचा हा कृतघ्नपणाच आहे. ‘मातृदेवो भव, पितृदेवो भव’ अशी शिकवण देणार्‍या संस्कृतीमध्ये आज ‘आई-वडिलांची सेवा करा, असे सांगावे लागते’, हे लाजिरवाणे आहे. या सर्व परिस्थितीचे कारण म्हणजे संस्कारांची तोकडी पुंजी ! नात्यांमधील ओलावा कमी होऊन एक प्रकारची रूक्षता निर्माण होण्यामागे संस्कारांचा अभाव आणि एकत्र कुटुंबपद्धतीचा लोप ही प्रमुख कारणे आहेत. अशी विविध बाबी डोळ्यासमोर ठेवून आजचा कार्यक्रमांचे आयोजन असल्याचे ते म्हणाले.
        सदर कार्यक्रम प्रसंगी अनेकांची डोळे पाणावले होते. अनेकांच्या चेहऱ्यावर सुखद आनंद दिसून येत होता. तर नितीन वाल्हे व रविंद्र राजपूत यांनी आई - वडिलांच्या जीवनावरील गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली. आगळा वेगळा कार्यक्रमाचे आयोजन केल्यामुळे समाजमनात उत्कृष्ठ प्रतिक्रीया उमटत आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश चौधरी यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व विभाग प्रमुख व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले...


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

About Us

News Blogger Template is Designed Theme for Giving Enhanced look Various Features are available Which is designed in User friendly to handle by Piki Developers. Simple and elegant themes for making it more comfortable